Sunday, June 5, 2011

एक झकास विक एंड

 वाह!! मस्तं गेला विक एंड. शनिवारी ऑफिस तर्फे Movie (Ready) आणि रविवारी संध्याकाळी लोणावळा. अर्थात काही कारणामुळे Movie बघायला जायचा अजिबात मूड नव्हता पण हो नाही करत कसा तरी ४.३० वाजता Interval पर्यंत पोचलो. आता तुम्ही म्हणाल की Interval पर्यंत का? तर त्याच कारण असं की Show ३.३० चा होता. म्हणून मग थोडं खाल्लं आणि आत मध्ये गेलो. पण आधी काय झाल आहे हे काहीच माहित नसल्यामुळे बघण्याचा इंटरेस्ट गेला होता. तरी पण थोडावेळ बसलो आणि साधारण ५.१५ ला तिथून मित्राला काहीतरी कारण सांगून तिथून पळ काढला आणि थेट घरी आलो.

पण रविवार मस्तं गेला. सकाळी आरामात उठलो. दुपार पर्यंतचा दिवस घरीच गेला त्यामुळे खूप कांटाळ आला होता. म्हणून मग बाहेर पडायचं ठरवतच होतो तेवढ्यात मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला "मस्तं पाउस आहे लोणावळ्याला जायचं का फिरायला"? हे ऐकल्याबरोबर क्षणाचाही विचार न  करता हो म्हणलं आणि कार काढली.  अजून दोघा मित्रांना फोन केला.  कुठे भेटायचं हे ठरलं आणि त्याप्रमणे सगळे वेळेत पोचले (?) आता निघायला जवळपास ५.३० वाजले होते. तिथे पोहोचेपर्यंत बराच अंधार होणार हे माहित होत म्हणून मग अधेमध्ये कुठेही न थांबण्याचा एकमताने ठराव पास झाला.

वातावरण एकदम झकास होतं. आजूबाजूचा परिसर एवढ्या पावसाने सुद्धा हिरवागार दिसत होता. ते बघून मला सोनू निगम ने गायलेल्या "हिरवा निसर्ग हा भवतीने" ह्या गाण्याची आठवण झाली.  आता उजेड आणि अंधार ह्यामधलं अंतर कमी होत होतं तसा गाडीचा वेग वाढत चालला होता.

शेवटी अंधाराच्या आत आम्ही लोणावळ्याला पोचलो आणि तडक Tiger Hill  ला जाण्यचा निर्णय घेतला. पण Traffic  मध्ये १५-२० मिनिटे वाया गेली त्यामुळे शेवटी जे व्हायचं तेच झालं. तिथे पोचेपर्यंत जवळपास अंधारून आलं होतं. आम्हाला असं वाटलं की उशीर झाल्यामुळे आमच्या चौघांशिवाय तिथे कोणी नसेल पण अजूनही गर्दी होती. भरपूर धुकं होतं आणि अंधारही खूप झाला होता म्हणून मग जमेल तसे फोटो काढले.
अंधारात काढलेले फोटो ते त्यामुळे यायचे तसेच आले.
फोटो काढताना लक्षात आलं की आमच्यातला एकजण गायब आहे. त्याचा mobile  पण लागत नव्हता. "कुठे जायचं होतं तर सांगून तरी जायचं" असं आमच्यातला एकजण वैतागून म्हणाला. तेवढ्यात अंधारात कोणीतरी चाचपडत येताना दिसलं. जरा नीट बघितलं तर आमचंच " ध्यान " होतं. आम्ही त्याच्यावर ओरडणार तेवढ्यात तो म्हणाला " दोस्तो गरमा गरम Onion  पकोडे और चाय लाया हुं"  हे ऐकून पुढची होणारी  बा (चा ) आणि बा (ची ) वाचली. मग काय सगळ्यांनी मस्त पकोडे आणि चाय ह्यावर ताव मारला. पावसाळ्यात आणि थंड  हवेच्या ठिकाणी भुट्टा (कणीस) नाही खाल्ला तर तो Foul धरतात. म्हणून मग नंतर सगळ्यांनी कणसाच्या गाडी कडे आगेकूच केली.

वातावरण इतकं छान होतं की तिथून निघावं वाटत नव्हतं. पण अंधारही भरपूर झाला होता आणि गर्दी सुद्धा कमी झाली होती. म्हणून मग तिथून निघालो आणि लोणावळ्याची Special चिक्की घेतली आणि परतीचा मार्ग धरला आणि विक एंड चा end  मस्त झाला.




2 comments:

  1. Ratnagiri Property is great place for meditation, eco living and cultural place, it's best tourism place must visit yearly.. i found many informative info from this post and blog

    ReplyDelete
  2. Woww...never knew you write...its great.. also happy birthday, and lots of love..I wish you spent more time with us💓💓

    ReplyDelete